अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी
मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग राज्य शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली मात्र ग्रामीण भागात प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच करावी….
