प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही
ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा, काजू फळपीक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत आंबा पिकामध्ये ३ हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण ९०० शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत आज शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन २८ जानेवारी २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक…
