पुस्तकातील वाक्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात,वाचनाने मिळते भवतालचे भान
कवी गणेश विसपुते यांचे प्रतिपादन:कै.जयानंद मठकर स्मृति व्याख्यानमाला सावंतवाडी (प्रतिनिधी) “पुस्तकातील काही वाक्ये आणि अवतरणे जीवनाचे तत्त्वज्ञान आणि अर्थ स्पष्ट करतात. ती आपल्याला भानावर आणून वास्तव जगाची जाणीव करून देतात. त्यामुळे प्रत्येकाने विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे विचार प्रसिद्ध कवी गणेश विसपुते यांनी व्यक्त केले. येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित स्वातंत्र्य…
