धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन; सत्ताधारी आणि साहित्यिक युती निकोप समाजासाठी धोकादायक: कवी अजय कांडर
सावंतवाडी: नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे स्मृती पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन २०२६ सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे अनेक विचारवंतांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. यावेळी धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन मिळत असल्याने सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक आहे. अशावेळी व्यवस्थेला शरण न जाणारा लेखक कवीच चांगले लेखन करू शकतो आणि असेच…
