भारताचे जगद्विख्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची घटना ही प्रत्येक भारतीयाचे मन दुःखाने व्याकुळ करणारी! माझ्या उद्योजकीय वाटचालीतील हा महान मार्गदर्शक हरपला..!
आपला यावर्षीचा वाढदिवस रतन टाटांच्या स्मृतीला अर्पण, जनहिताचे कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे, मात्र कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सोहळे साजरे न करण्यासाठी विशाल परब यांचे भावनिक आवाहन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी माझ्यासारख्या असंख्य उद्योजकांचे आदर्श असे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा नुकतेच पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने या देशाची कधीही न भरून निघणारी अपरिमित हानी झाली आहे. संपूर्ण देशावर दुःखाची अवकळा पसरली…
