सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बोगस…

माणगाव मध्ये एक व्यक्ती वाहून गेल्यानंतर पण आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ता नाही:युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी

माणगाव मिलिंद धुरी
आज माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस पडतोय या पार्श्वभूमीवर जिल्हात पुरस्थितीवर आपत्ती व्यवस्थापनाचा लक्ष असावा लागतो
◾️मात्र जिल्ह्याच आपत्ती व्यवस्थापन बोगस आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं
◾️आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली लाखो कोटी रुपयांची तरतुद होत असते मात्र त्याचा नक्की कोणाला फायदा हा संशोधनाचा भाग आहे
◾️ज्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल ते एसी मध्ये बसून आहेत ते फक्त निवडणूकाना पैसे वाटण्यासाठीच जिल्ह्यात येत असतात बाकी त्यांचा जिल्ह्याला काहीच फायदा नाही
◾️माणगाव आंबेरी पुलावरुन एक व्यक्ती वाहून गेल्यावर आता 5 तास होऊन देखील NDRF पथक पोचलं नाही मग अश्या टीम चा काय फायदा
◾️पाच तास उलटूनही प्रशासन जाग होत नसेल,पथक पोचत नसेल तर जिल्हाधिकारी जिल्ह्यात आहेत की नाही असा प्रश्न पडतो,की मान्सून एन्जॉय करता आहेत
◾️ पावसाच्या आधी कॉल करून सगळयांना बोलवून घ्यायच आणि रंगीत तालीम घ्यायची की आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम संपला
◾️त्या वाहून गेललेल्या व्यक्तीला काय झालं तर त्याला आपत्ती व्यवस्थापन,जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जबाबदार राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page