अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान..

शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी

कुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील गोठोस,आंबेरी,वाडोस मोरे,कांदुळी,निवजे,दुकानवाड, महादेवाचे केरवडे,आंजीवडे,उपवडे, वसोली,शिवापूर,हळदीचे नेरूर अशा अनेक गावांतील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अनेक ठिकाणी कापणी केलेले भात पीक पूर्णपणे भिजून गेलेले आहे.तर उभे भात पिक जमीन दोस्त झालेले आहे त्यामुळे वर्षभराचे मेहनत माती मोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला.परतीच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कष्ट करून उभे केलेले पीक असे जमीन दोस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे
शासनाने तातडीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page