तेरेखोल नदी पात्रा मधील वाळू माफियांना नक्की आशीर्वाद कोणाचा?
गौणखनिजाची बेकायदेशीर लूट सुरू,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा:ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी प्रतिनिधी सांगेली, माडखोलसह तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू व अन्य गौणखनिजांची बेकायदेशीर लूट सुरू असून, यामध्ये स्थानिक वाळू माफियांना प्रशासनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वाद मिळत असल्याचा गंभीर आरोप माडखोल ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास २६ जानेवारीपासून…
सावंतवाडीत एका दिवसात दोन आत्महत्या
पोलीस घटनास्थळी दाखल,चौकशी सुरू सावंतवाडी प्रतिनिधी येथील बिरोडकर टेंब परिसरातील जंगलमय भागात पुन्हा एका युवकाने आत्महत्या केली आहे. ही घटना सायंकाळी उघडकीस आली. दुपारी एक घटना घडलेली असताना आता पुन्हा हा प्रकार घडल्यामुळे अवघी सावंतवाडी सुन्न झाली आहे. गेल्या दोन दिवसात घडलेली ही तिसरी आत्महत्या आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून…
पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
कणकवली प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील धनगर समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली “समाज भवन” उभारणी ची मागणी मार्गी लागण्याची शक्यता..
राजेश वरक (गोठोस) यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाची ५ एप्रिल ला कुडाळ येथे महत्त्वाची विशेष बैठक.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली ‘समाज भवन’ उभारणीची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक २:३०…
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार;संदीप काळे
पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद पुणे प्रतिनिधी पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे…
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचार
“त्या” संशयास्पद पुस्तकं खरेदीचे कोट्याचे बिल पुरवठादारास अदा करण्यासाठी झाली नवीन “डील?” पुस्तक खरेदीमागे “भ्रष्टाचाराचा हैदोस!” सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप कुडाळ प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार चालू असून भ्रष्टाचाराचे नवीन “कांड” समोर येत आहे. सन 2024-25 मध्ये सुमारे 2 कोटी किंमतीची पुस्तक खरेदीचा पुरवठा दाखवून देयक लाटण्याचा प्रकार उघडकीस आणत त्यावर…
सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे:प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे
सावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन…
हुमरमळा वालावल येथील श्रीम लिनता लवु परकर यांना पेन्शन योजना मंजुर!
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात मंजुरी पत्र, नायब तहसीलदार संजय गवस यांनी दीले मंजुरीचे पत्र! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल येथील संजय गांधी निराधार समीती कडुन मंजुर लाभार्थी श्रीम लिनता लवु परकर या लाभार्थींना मंजुरीचे पत्र नायब तहसीलदार श्री संजय गवस यांनी आज दीले छत्रपती शिवाजी महाराज राजस्वअभियान सध्या सुरू असुन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्या…
सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात…
गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद
जमीन हक्क, खातेफोडी प्रश्नांवर माणगावमध्ये प्रशासनाकडून मार्गदर्शन माणगाव प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला. शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. उपस्थित…
