गेली अनेक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे रिक्त असलेले मुख्याधिकारी पद पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाणार:आमदार दीपक केसरकर.
सावंतवाडी प्रतिनिधी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद हे गेली अनेक दिवस रिक्त होते. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन या नगरपरिषदेचा कार्यभार हाकला जात होता. मात्र आमदार श्री.दीपक केसरकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार आहे . सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने लोकांची फार मोठी गैरसोय होत होती. तसेच अनेक विकास कामांमध्ये अडथळा निर्माण…
सिंधुदुर्गातील प्राथमिक आणी माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची जि.प.च्या सीईओकडे मागणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना शिक्षक परिषदेचे लेखी निवेदन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सर्व शाळा सकाळ सत्रात भरविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले…
बिबवणे नाईकवाडी येथून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता
कुडाळ प्रतिनिधी बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या 5 जून रोजी सकाळी आपल्या घरातून कुडाळ येथे जाण्यासाठी बाहेर पडल्या कुडाळ येथे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिराला जाते, असे त्यांनी घरात सांगून…
नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित
उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. सीएनजी करिता वाहन चालकांना तासंतास रांगेत रहावे…
मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे
राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित! कणकवली प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या निर्णय आणि परिवर्तनाचा लेखाजोखा मांडला. २०१४ पूर्वी देशात असलेल्या असुरक्षिततेच्या वातावरणातून मोदींनी देशाला बाहेर काढत…
आंबोली परिसरातील धोकादायक वृक्ष छाटणी ला सुरुवात;मा.सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश..!
आंबोली घाटात धोकादायक स्थिती मध्ये दरड – मोठा अपघात होण्याची शक्यता. आंबोली प्रतिनिधी आंबोली गाव हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागा च्या आत्यारीतील रस्त्यावरील धोकादायक झाडे ही छाटण्यात यावेत. तसेच आंबोली घाट परिसरात अजूनही बरीचशी धोकादायक झाडे आहेत ती देखील वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने संयुक्त कार्यवाही करून छाटणी करावी. आंबोली घाटात श्री देव पूर्वीचा वस…
प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या कणकवली प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे श्री राणे यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री जन मन आवास योजना योजनेअंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावामध्ये 4 घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुले पूर्ण झाली आहेत. सदर योजनेतील…
बनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची महावितरणला धडक..
मनसे कडून महावितरणला खळखट्याक इशारा.. वेंगुर्ला प्रतिनिधी काही दिवसापासून वेंगुर्ला तालुक्यातील नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्याबाबत महावितरण करून मोबाईलवर संदेश येत होते. याच अनुषंगाने आज मनसेच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष सनी उर्फ गोपाळ बागकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला धडक दिली. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे जाहीर करतात तर दुसरीकडे महावितरण मार्फत नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणे अनिवार्य…
राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन वृद्धी ही होईल ज्यामुळे व्यापार वाढेल या दृष्टिकोनातून हे वृक्ष लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात…
सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
वेंगुर्ला प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार, १३ जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. वसुधा मोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक…
